कामगार–कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्या ; सरकारचे निर्देश

0

मुंबई :- कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे १४ एप्रिलपर्यंत सर्व उद्योग, अनेक दुकाने व आस्थापना बंद आहेत. याचा कामगारांवर विपरीत परिणाम होणार नाही याची सर्व उद्योग, आस्थापनांच्या संचालकांनी काळजी घ्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत.

याबाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे की, खाजगी आस्थापनात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांशी, कामगार–कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्या. लॉकडाऊनमध्ये कामगारांचा कामावर न येण्याचा कालावधी पगारी रजा गृहीत धरा. कोणत्याही कामगार- कर्मचाऱ्याचे वेतन कमी होणार नाही याची काळजी घ्या. हा आदेश राज्यातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यिक संस्था, व्यापारी, दुकानदार व आस्थापनांना लागू राहील. याबाबतची माहिती www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.