वृत्त संस्था –
आशियाई चषकासाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आलेली असून, रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचसोबत शिखर धवनला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याचसोबत महाराष्ट्राच्या केदार जाधवनेही प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. तर खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे. १५ सप्टेंबरपासून युएईत आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.