आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी ; एकनाथराव खडसे

0

मुंबई : जळगावमधील आशादीप या शासकीय महिला वसतिगृहात पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप रत्नमाला सोनार यांनी केला आहे. दरम्यान,  रत्नमाला सोनार यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

 

आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते. या आरोपांमुळे जळगावाची बदनामी झाली, असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले. ते मुंबईत बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 4 मार्च रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल विधानसभेत मांडला. या अहवालानुसार असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात आहे.

 

“आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे,” असे एकनाथ खढसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.