अमृत योजनेच्या पाण्याच्या टाकीवरून पडून मजुरांचा मृत्यू

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील गडकरी नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहेत. या ठिकाणी काम करणारा मजूर सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीवर काम करीत असतांना अचानक जमिनीवर पडल्याने डोक्याला व तोंडाला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान मजुराचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.

अमृत योजना ही भुसावळकारांना डोकेदुखी झाली आहे. यामुळे कित्येक अपघात झाले आहेत. तसेच अनेक वाहने या योजनेच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यामध्ये फसलेले आहेत. अशा या संथ गतीने सुरू असलेल्या भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधकाम सुरू आहे.

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या गावातील विकास बळीराम पाटील (वय ४०) या मजुरांचा सकाळी काम करीत असतांना पाण्याच्या टाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. काम करणाऱ्या मंजुराला सेफ्टी साहित्य देण्यात आलेली नव्हते. यामुळे मजूर पाण्याच्या टाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडावर मार लागला.

घटनास्थळावरून रुग्णवाहिका बोलविले असता अर्धा तास झाल्यानंतरही न आल्याने काम करणाऱ्या मजुरांनी रिक्षांमध्ये जखमीस उपचारासाठी साईपुष्प रुग्णालयात हलविले. डॉक्टर निलेश महाजनांनी बाहेरच्या बाहेर उपचार करून सिदम हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा सल्ला दिला. सिदम हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान विकास बळीराम पाटील या मजुरांचा दुपारी २:०० वाजेच्या दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यामुळे परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुली व १ मुलगा असा परिवार आहे.

भुसावळ शहरात अमृत योजनेच्या ५ पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू आहे. त्यातील गडकरी नगर मधील टाकी क्रमांक १० चे काम करणारा मजूर विकास बळीराम पाटील या मजुरांचा पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. जैन एरिकेशनच्या माध्यमातून औरंगाबाद येथील ठेकेदार नितीन पटेल यास भुसावळ शहरातील अमृत योजनेच्या नवीन ५ पाण्याच्या टाक्या तयार करण्याचे काम दिले आहे. दिनांक १५/१२/२०२१ रोजी सकाळी मजूर काम करीत असताना पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिवारातील प्रमुख काळाने हिरावून घेतल्याने परिवारासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकावे जेणे करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी मजुरांची जीवाशी खेळ खेळणं बंद करेल.

भुसावळ शहरात आज रोजी एका मजुरांचा अमृत योजनेचे काम करीत असतांना मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. पण घटनास्थळी एकही अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी मृत्यू झाल्यापर्यत गेले नव्हते. सर्व अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जय्यत तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.