दैव बलवत्तर होते म्हणून वाचले प्राण माजी . उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी हे अपघातातून बालंबाल बचावले आहेत

0

लोकशाही  न्यूज नेटवर्क 

यावल; नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी हे औरंगाबाद येथील एका विवाह समारंभात  गेले* असता ते औरंगाबाद येथून परतीच्या वेळी दि. १९. रोजी सकाळी 4. ते. 5 वाजेदरम्यान जामनेर व पहूर च्या मध्ये त्यांच्या ईनोवा गाडीचे टायर फुटल्यामुळे त्यांची गाडी चार ते पाच वेळा पलटी झाली इतका मोठा भयंकर अपघात झालेला असून सुद्धा गाडी मध्ये असलेल्या सर्व जण सुरक्षित आहे.

गाडीमधील असलेल्या लोकांना फक्त किरकोळ मुका मार लागला असून,कोणीही यात जखमी झालेले नाही शेख असलम नबी हे नेहमी चांगले काम करत असतात त्या चांगल्या कामामुळे  व अल्लाहच्या आशीर्वाद मुळे आपण सुखरूप असल्याचे शेख असलम यांनी सांगितले.

बालंबाल वाचल्यामुळे ते लवकर अन्नदानाचा कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. प्रसंगी माजी नगराध्यक्ष राकेश कोलते ,अभय शेठ देवरे,गणेश महाजन, एजाज देशमुख,हाजी फारूक शेख,पत्रकार भरत कोळी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून विचारपुस केली,

Leave A Reply

Your email address will not be published.