‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीची आत्महत्या

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

टीव्ही इंडस्ट्रीमधून (TV industry) एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या (Vaishali Thakkar Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अभिनेत्रीने वैशाली ठक्करने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. अद्याप अभिनेत्रीच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाहीय. परंतु पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वैशाली ठक्करने 2015 मध्ये ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेतून वैशालीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

या मालिकेनंतर ती लगेचच ‘ये है आशिकी’ या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती. त्यांनतर वैशाली टक्करने कलर्स वाहिनीवरील ‘ससुराल सिमर का’ मालिकेत काम केलं होतं. यामध्ये तिने सिमर अर्थातच दीपिका कक्करच्या लेकीची अंजलीची भूमिका साकारली होती. तसेच वैशालीने लाल इश्क, सुपर सिस्टर, मनमोहिनी सीजन २ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. वैशालीने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.