कजगाव ता. भडगाव : – तालुक्यातील वाघळी शिवारात कडाक्याचे उन्हामुळे २५ मेंढयांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून यामुळे मेंढपाळाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर रा. जामधरी ता. नांदगाव यांचा मेंढ्यांचा वाडा दाखल झाला आहे. दि. २५ रोजी मेंढ्या चराईसाठी वाघळी शिवारात आले असता दि. २५ रोजी दुपारी एक वाजे नंतर एका मागून एक करत मेंढ्या कोसळू लागल्याने त्यांचा उस्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
यामुळे मेंढपाळ यांचे अंदाजे २ ते ३ लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाअध्यक्ष पोपट भोळे, मल्हार सेनेचे नाशिक विभाग अध्यक्ष गणेश जाने, ह.भ.प. संदिप महाराज, हनुमंत बोरसे व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सपकाळ, वाघळीचे तलाठी शेळके यांनी पंचनामा केला आहे.