संतापजनक; त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांना दमदाटी, साधूंनी चाकू घेत केले असे काही..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेस उद्यापासून (दि.०६) सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहे. सुमारे पाच लाख भाविक आणि ६०० हुन अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार त्र्यंबकमध्ये घडला आहे.

निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला आलेला वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे. काही साधूंनी शिवीगाळ करत हाकलून दिल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी वारकरी थांबले होते. त्या ठिकाणी येउन संधूनी शिवीगाळ केल्याचे समजते.

साधूंवर कडक कारवाईची मागणी
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आलेल्या भाविकांची निवासस्थान ठरवलेले असते. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांनी आपापल्या जागेवर आपले तंबू बांधले होते. मात्र काही साधूंनी येउन ही जागा आमची आहे. असे म्हणत दमदाटी करून वारकऱ्यांवर शिवीगाळ केला. तसेच हातात चाकू घेऊन साधूंनी वारकऱ्यांचे तंबू उखडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या साधूंवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे, या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.