Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाऱ्याने चाळीशी ओलांडली ! जिल्ह्यात तापमान ४३ अंशावर
    जळगाव

    पाऱ्याने चाळीशी ओलांडली ! जिल्ह्यात तापमान ४३ अंशावर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट होते. मात्र अवकाळी पावसानंतर पारा पुन्हा ४० अंशावर गेला आहे. चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन हवामान कोरडे झाले आहे. तसेच राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचा वेग वाढू लागल्याने जळगाव शहराच्या पाऱ्याने पुन्हा चाळीशी ओलाडली असून मंगळवारी किमान तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे जळगावकरांना ‘मे हिट’ ची अनुभूती आली.

    जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस होत असतो. मात्र या दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरीच्या ४८९ टक्के पाऊस झालेला आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस जळगाव जिल्ह्यात यंदा झालेला आहे. दि.६ मे नंतर तापमानाचा पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. या आठवड्यात राजस्थानमार्गे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग वाढत आहे. एकीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्राकडे अँटी सायक्लोनची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गुजरात, राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचे प्रमाण वाढणार असून दि.१० ते १६ मे दरम्यान जळगाव जिल्ह्याचे तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

    हिट पुन्हा वाढणार
    राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचा दिवसेंदिवस वेग वाढल्यास पारा दि. १० ते १३ मेदरम्यान किमान तापमान ४४ अशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आगामी आठवडाभर तापमानाचा पारा दिवसागणिक वाढणार असून जळगावचा पारा ४४ ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आठ दिवस ‘मे हिट’ची लाट येणार असल्याने दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकयांनी दिला आहे.

    वेदर वेलनेसचा अंदाज
    वेदरवेलनेस कडून आज जळगावसह भुसावळ, अमळनेर, एरंडोल, फैजपूर, जाम् नेर, वरणगाव व यावल येथे ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. रात्री ८ वाजेनंतर पारा ४० अंशाखाली येईल तसेच १४ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वेदरवेलनेसचे निलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.

    jalgaon me hit
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif