जळगाव ;- श्री स्वामी समर्थ खासबाग संस्था संचलित, ‘गुरूपदम’ पोखरी यांच्या वतीने संस्कार व संस्कृती यांचे मुलांना व पालकांना प्रात्यक्षिक म्हणून जळगांव नगरीचे महान संत श्री अप्पा महाराज यांच्या समाधी स्थळापासून पदयात्रा आयोजितकरण्यात आली आहे.
. यासाठी सर्व गुरूभक्त व स्वामीभक्तांना आवाहन केले जात आहे की, दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ६.वा. अप्पा महाराज समाधी येथे उपस्थित रहावे. पदयात्रा शहरातुन निघून गुरूपदम पोखरी येथे साधारणपणे १६ कि.मी.पायी पूर्ण करण्यात येणार आहे . भाविकांनी महाराष्ट्रीयन पोशाखात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.