मित्रांच्या जाचामुळे तरूणाची आत्महत्या; नातेवाईकांचा आरोप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एका २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मित्रांनी पैश्यांसाठी तगादा लावल्याने त्याने आत्महत्या केली असून तिघांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगावातील हरीविठ्ठल नगर येथील रहिवासी गोरख अशोक कोळी (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गोरख कोळी हा आई आणि लहान भाऊ यांच्यासह राहतो. बांधकामाच्या ठिकाणी सेंटींग काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गोरख कोळी हा त्याचा मित्र सोनू कोळी याच्यासोबत राहत होता.

सोमवारी २ मे रोजी घरी कुणीही नसतांना गोरखने राहत्या घरात दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्याने समोर आले. गोरख कोळी यांचे मामा प्रल्हाद कोळी हे रामेश्वर कॉलनीत राहतात. गोरखने आत्महत्या केली असून त्याला गळफास देण्यात आला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोरखचा मित्र सोनू कोळी आणि इतर दोन जण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून तिनही मित्रांनी संगनमताने त्याला गळफास दिली आहे असा आरोप मयत गोरखची आई आक्का आणि मामा प्रल्हाद कोळी यांनी केला आहे.

तसेच घटनास्थळी संशयास्पद स्थितीत गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला असून प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.