लोकशाही न्यूज नेटवर्क
सिक्कीममध्ये पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात भारतीय लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहे. बेपत्ता जवानांमध्ये ४ जवानांचे मृतदेह सापडले आहेत. एवढेच नाही तर, छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटकही सिक्कीममध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील पर्यटक अटकल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील आठ पर्यटकांचा समावेश आहे. सिल्लोड शहरातील जैन आणि सहारे कुटुंब पर्यटनाला सिक्कीमला गेले होते. पहिल्या दिवशी त्यांनी पाऊस जास्त असल्याचे सांगितले मात्र, त्यांनतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे.