राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीला मिळणार ९ मंत्रीपदे ; अनिल भाईदास पाटलांची लागणार मंत्रीपदी वर्णी !

0

मुंबई ;- राज्याच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप पाहायला;आता मिळाले असून विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या ३० आमदारांसह राजभवनात दाखल झाले असून यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत. राष्ट्रवादीला शिंदे फडणवीस सरकारमध्ये ९ मंत्रीपदे मिळण्याची चर्चा असून अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे ,

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत. अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.