सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या

0

मुंबई ;- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

अनेक सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात, असे कारण यासाठी दिले आहे. यामुळे सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
दरम्यान, राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, ३० जूननंतर राज्यभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकल्यात आल्या आहेत.

यामध्ये निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ८२ हजार ६३१ आहे. त्यातील ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा संस्थांपैकी ४२ हजार १५७ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहा हजार ५१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामुळे इच्छुकांना काही काळ थांबावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.