मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
२६/११ हा एक भयंकर हमला अतिरेक्यांकडून करण्यात आलेला होता. ज्यात हजारो नागरिकांचे प्राण गेले. आणि हा हमला आजहि प्रयेकाने आठवला जरी तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. त्यातच ठोंगे नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती दिली. त्याने यापैकी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे.तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राजा यांनी दिली आहे. यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे हे तीन अतिरेकी भारतात आल्याचं राजा ठोंगे यांनी म्हटलं आहे. तसंच यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.