मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज आपण या अंगणवाडीचा भाग -२ पाहणार आहोत. मागील भागात आपण निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणाऱ्याला या ईमारतीमध्ये लहान-लहान मुले बसतील याचे भान सुद्धा राहिले नाही. काळ्या मातीमध्ये पाया कीती खोल घ्यावा लागतो. हे संबंधित अभियंत्यांनी पहायला हवे, परंतु येथे सर्वच एका माळेचे मणी दिसत आहेत. एवढे काम होऊनही अभियंता महाशयांनी ते कसे खपवून घेतले ? हे सामान्य जनतेला पडलेले एक कोडेच आहे. ठेकेदाराला काम पूर्ण करून घ्यायचे होते. आणि अभियंता यांना एम.बी.बनवायची होती. पण प्रत्यक्षात साईटवर जाऊन कामाचे अवलोकन करून एम.बी.बनवायची असते. हे बहुतेक संबंधित यांना माहिती नसावे असे वाटते. पाया खोदणी पासून ते काम पूर्ण होईपर्यंत याकडे कोणाचेच लक्ष नव्हते की मुद्दाम दुर्लक्ष केले ? असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे. खरंच हे योग्य आहे का? साहेब असा प्रश्न जनता एकमेकांना विचारत आहे. यात दोष कुणाचा ?ही चौकशी झाली पाहिजे असे मुलांच्या पालकांना वाटते….. उर्वरीत पुढील भागात…..