विवाहितेचा जळाल्याने मृत्यू; घातपाताचा संशय

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव महाबळ परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय विवाहितेचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मयत विवाहितेच्या भावाने घातपातचा आरोप केला असून यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

जयश्री बळवंत नेरे (वय ५३, रा. अनुराग स्टेट कॉलनी, महाबळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. जयश्री नेरे हे पती बळवंत नेरे यांच्यासह सवत भारती नेरे यांच्यासह वास्तव्याला आहे. बळवंत नेरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन कार्यालयात नोकरीला होतो. दीड वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत.

दरम्यान बुधवार २ मार्च रोजी सायंकाळी जयश्री नेरे ह्या जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्कीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत महिलेचा भाऊ सुजित जाधव याने आरोप केला आहे की, बाहिणीला अकस्मात आग लागलेली नसून तिच्यासोबत घातपात केला आहे असा आरोप केला आहे. जयश्री बळवंत नेरे यांचा विवाह बळवंत नेरे यांच्याशी २५ वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर दहावर्षांपर्यत त्यांना मुलबाळ होत नसल्याने त्यांनी भारती नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. पती व दुसऱ्या पत्नीसह इतरांनी तिचा छळ करून तिला जिवंत जाळले आहे असा आरोप केला आहे. तिच्या पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत विवाहितेचा भाऊ सुजित जाधव याने केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.