मोठी बातमी; ममता बॅनर्जी फुटल्या, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला मोठा झटका

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या कळपातून पहिला पक्ष बाहेर निघालाय. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिला आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. काँग्रेसने TMC चा प्रस्ताव मांडला नाही, म्हणून हा निर्णय घेतला, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. TMC मी एकट्याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. काँग्रेस पक्षासोबत माझी कुठलीही चर्चा झाली नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. “पश्चिम बंगाल मध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासूनच सांगण्यात आलं आहे. आमची धर्मनिरपेक्ष पार्टी आहे असं त्या म्हणाल्या. “आम्ही स्वबळावर भाजपाला हरवू शकतो, मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांनी न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण त्या बद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं नाही”. अस त्या म्हणाल्या.

चर्चा कुठे फिस्कटली?
जागा वाटपावरून काँग्रेस आणि TMC एक मत झालं नाही यांच्या सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसकडून, काँग्रेसकडून 10 ते 12 जागांची मागणी करण्यात येत होती. पण TMC केवळ दोन जागा द्यायला तयार होते. काँग्रेसला हे मान्य नव्हता. बस्स चर्चा इथेच फिस्कटली. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बहरामपूर आणि मालदा दक्षिण या दोन जागा जिंकल्या. त्या दोन जागांची टीएमसीकडून मागणी सुरु होती. पण काँग्रेस त्यासाठी तयार नव्हती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेस राज्यातील सर्व 42 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, हे जाहीर केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.