लोकशाही न्यूज नेटवर्क
अनके जण आपले आयुष्य अनेक खाचखळगे पार करून व्यतीत करतात. प्रत्येकाला आराम दायी जीवनशैलीचे आकर्षण असते . पण प्रत्येकाच्या नशिबात ते असतेच असे नाही. मात्र आपले नशीब वयाच्या कोणत्याही टर्मला बदलू शकते याचा जणू प्रत्यय ८८ वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या कुटुंबाला आला आहे. यांना तब्बल ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली असून त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.
मोहालीच्या डेराबसी येथे त्रिवेदी कॅम्प गावात राहणाऱ्या मंदिराचे महंत द्वारका दास यांना ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली. लॉटरीत ५ कोटी रुपये जिंकल्यानंतर द्वारका दास यांच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. कुटुंबीयांनी वृद्धाला फुलांचा हार घालून जल्लोष साजरा केला.
लॉटरीचे हे तिकीट जिरकपूर येथील महंत द्वारका दास यांच्या नातवाने त्यांच्या आजोबांच्या नावाने खरेदी केले होते. लोकेश कुमार नावाच्या व्यक्तीने सांगितले की, त्याचे जिरकपूर-पंचकुला रोडवर लॉटरीचे दुकान आहे. महंताचे नातू निखिल शर्मा लोहरीनिमित्त दुकानात आला आणि मकर संक्रांतीचे बंपर तिकीट खरेदी केले. तो म्हणाला की, योगायोगाने त्याच्या आजोबांनी ही लॉटरी जिंकली आणि ते लगेच करोडपती झाले.
महत्त्वाचे म्हणजे महंत यांचा मुलगा नरेंद्र कुमार हा ऑटोचालक आहे. लॉलॉटरीत ५ कोटी रुपये जिंकल्यानंतर महंत द्वारका दास म्हणाले की, आम्हाला आनंद होत आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, आता तुम्ही करोडपती झालात, त्यावर ते म्हणाले की, देवाने सर्वांना करोडपती बनवावे. तसेच मी जवळपास ३५-४० वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहे, पण आता त्यांचे नशिबफळफळले.
लॉटरीत मिळालेल्या पैशाचे काय करणार असा प्रश्न त्यांना विचारला असता महंत द्वारका दास यांनी या वयात या पैशांचे काय करणार? असे उत्तर दिले. दरम्यान महंत द्वारका दास यांना दोन मुलं आणि बायको आहेत, तिघांमध्येही ते पैसे समान वाटून देणार असल्याचं त्यांनी सांगितले.