केरळमध्ये उष्णतेची लाट, महाराष्ट्राला बसणार बसणार झळा !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात थंडीने काढता पाय घेतला. फाजल महाराष्ट्रतच नव्हे तर, देशातील काही राज्यांमध्येही थंडीचं प्रमाण कमी झालं, अतीव उत्तरेकडील राज्य मात्र इथं अपवाद ठरली. तर, दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या हवामानाचा वेगळं आणि तितकंच रौद्र रूप पाहायला मिळत आहे. ज्या केरळच्या वेशीवर देशातील मोसमी पावसाचे वारे अर्थात मान्सून पहिलं पाऊल ठेवतो त्याच केरळात आता उष्णतेच्या लाटा येण्यास सुरुवात झाली आहे. केरळमध्ये गेल्या काही काळापासून तापमानात होणाऱ्या वाढीमुळं आता राज्य शासन सतर्क झालं असून, त्यांनी राज्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.

केरळमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं एक इशारा देण्यात आला आहे. जिथं कन्नूर, कोट्टायम, कोझिकोडे आणि अलापुझ्झा जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यहून जास्त असेल असा इशारा देण्यता आला आहे. शनिवारीसुद्धा या भागामध्ये तापमानाचा आकडा जास्तच नोंदवण्यात आला होता.

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्द यांनीही नागरिकांना सतर्क राहत या उष्णतेच्या लाटेमध्ये स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता उष्माघात आणि उन्हाळ्यातील आजारांचा धोका लक्षात घेता पुरेस पाणी प्या, दिवसातील उष्ण तापमानाच्या वेळांमध्ये घराबाहेर जाणं टाळा असा सल्ला दिला आहे. शिवाय सुती आणि सैल कपडे घाला, फळं आणि सॅलडचा आहारात समावेश करा अशाही मार्गदर्शक सूचना केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.