कापूस चोरणारी टोळी जेरबंद ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई

0

चाळीसगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातून कापसाची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला असून ५ जणांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मनोहर पाटे (वाणी), वय ६८, रा. रांजणगांव, १८ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रांजणगांव शिवारातील शेतातील घराचा कडी कोयंडा तोडून घरात ठेवलेला ४९ हजार रुपये किमतीचा ७ क्विंटल कापूस चोरुन नेला म्हणून चाळीसगांव ग्रामीण पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी अजय जयवंत पाटील (वय-२५), प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील (२१), चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे (२५), शालीक अरुण पाटील (२५), सुरेश उर्फ पप्पू राजेंद्र कोष्ठी, वय २६, अ.नं. १, २ व ४, ५ रा. रांजणगांव, ता चाळीसगांव व आ.नं. ३ रा. जुना कोळीवाडा पिलखोड, ता चाळीसगांव आदिना अटक करण्यात आली. त्त्यांचेकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन १ लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप (क्र. एमएच ०४ – डीके – ४६१०) ही जप्त करण्यात आली.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, सफौ. राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पोना. शंकर जंजाळे, पोना. मनोज पाटील, पोना. संदिप माने, पोना . भूपेश वंजारी आदिच्यया पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ. राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.