मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून पाठीच्या दुखण्यामुळे क्रिकेट पासून दूर होता. पण आता आयपीएल (IPL) चा हंगाम लवकरच सुरु होणार असून, यात तो खेळे कि नाही याची प्रेत्येकाला आतुरता होती. तर जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांसाठी आनंददायी बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या सीझनमधून बुमराह क्रिकेटच्या मैदानात परतताना दिसणार आहे. मात्र, बुमराहचा फिटनेस लक्षात घेऊन BCCI नेही एक खास योजना आखली आहे.या वर्षाच्या अखेरीस भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. वर्ल्ड कपमुळे बुमराह टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. हे लक्षात घेऊन BCCI त्याचा वर्कलोड मॅनेज करण्याची तयारी करत आहे. पण बुमराहच्या वर्क लोड मॅनेजमेंटमध्ये मुंबई इंडियन्सची भूमिकाही खूप महत्त्वाची असणार आहे.
BCCIने बॉर्डर-गावस्कर मालिकेतील उर्वरित दोन कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहची निवड केलेली नाही. बुमराहला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही. बुमराहला काही सराव सामन्यांमध्ये सहभागी व्हायचे होते, अशी माहितीही समोर आली आहे. पण बुमराहला तो सामना खेळण्याचीही परवानगी मिळाली नाही.