जळगावकरांनो पाणी जपून वापरा ! सलग‎ दाेन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावकरांसाठी (Jalgaonkar) मोठी बातमी आहे. जळगावकर पाणी वापरतांना जरा सांभाळून कारण येत्या आठवड्यात सलग‎ दाेन दिवस शहरातील (Jalgaon City) पाणीपुरवठा बंद‎ राहणार आहे. जलशुद्धीकरण‎ केंद्रामधून शहरात येणाऱ्या जुन्या‎ जलवाहिनीला अमृत याेजनेंतर्गत‎ कस्तूरी हाॅटेलजवळ जाेडणीचे‎ काम केले जाणार आहे. हे काम २४‎ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू राहणार‎ आहे. त्यामुळे राेटेशन काेणत्या‎ दिवशी बंद करावे याबाबत प्रशासन‎ चाचपणी करीत आहे.‎

उमाळा येथे असलेल्या‎ जलशुद्धीकरण केंद्रापासून‎ टाकण्यात आलेली सिमेंटची‎ जलवाहिनी रामेश्वर काॅलनीतून‎ मेहरूण स्मशानभूमीमार्गे शहरात‎ दाखल हाेते. दरम्यान रामेश्वर काॅलनीत‎ सतत जलवाहिनी गळती हाेत‎ असल्याने त्या ठिकाणी १२००‎ मिलिमीटर व्यासाचे डीआय पाइप‎ टाकण्यात आले आहेत. नवीन व‎ जुनी जलवाहिनी जाेडणीचे काम‎ महामार्गालगत केले जाणार आहे.‎ यासाठी मक्तेदारामार्फत पाइप‎ जाेडणीची ठिकाणे निश्चित‎ करण्यात आले आहे. त्यामुळे‎ पुढच्या आठवड्यात साेमवारनंतर‎ काेणत्याही दिवशी जाेडणीचा‎ निर्णय घेतला जाणार आहे. त्यापूर्वी‎ तीन दिवस आधीच‎ महापालिकेकडून नागरिकांना‎ कळवले जाणार आहे.

तसेच पुढच्या‎ आठवड्यात सलग दाेन दिवस‎ पाणीपुरवठा बंद (Jalgaon Water Supply) राहणार असल्याने‎ पाण्याचा काटकसरीने वापर करणे‎ गरजेचे आहे. दरम्यान अमृत पाणीपुरवठा याेजनेची‎ चाचणी घेण्याच्या उद्देशाने‎ महापालिकेच्या माध्यमातून हे‎ नियाेजन केले जाते आहे. म्हणून ऐनवेळी ‎ नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये‎ म्हणून आठवडाभर आधीच‎ नागरिकांना सतर्क केले जाते आहे.‎

Leave A Reply

Your email address will not be published.