जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील विवेकानंद नगर येथे माहेर असलेल्या राधिका देवेंद्र तायडे (वय ३२) यांचा विवाह जळगावातील दिक्षित वाडी येथील देवेंद्र किशोर तायडे यांच्याशी रितीरिवाजानूसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती देवेंद्र याने पत्नीला माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला.
दरम्यान, विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पतीसह सासू, सासरे, दिर यांनी छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी १२ जून रोजी विवाहितेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती देवेंद्र किशोर तायडे, सासू सविता किशोर तायडे, सासरे किशोर चुडामन तायडे आणि दीर पंकज किशोर तायडे सर्व रा. वानखेडे, सोसायटी, दिक्षीत वाडी जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस नाईक अलका शिंदे करीत आहे.