जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबर पासून आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी समाज बांधव जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता मिळविणेसाठी २२ दिवसापासून अन्नत्याग, सत्याग्रह, आमरण उपोषण चालू आहे. याकडे शासन संबंधित उपोषण कर्त्यांच्या मागणी कडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे.
आदीवासी, टोकरे, कोळी, ढोर, कोळीमल्हार, कोळी महादेव, कोळी या जमातीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून त्यांचे संविधानिक अधिकार मिळणे पासून वंचित ठेवत असलेल्या निषेधार्य जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाज बांधव १ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जळगाव येथील बांभोरी गावा जवळ गिरणा नदि पुलाजवळ रस्ता रोको आंदोलन करणार आहे. गेल्या २२ दिवसा पासून आदिवासी कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र बाबत ६ पुरुष व २ महिलांनी अन्नत्याग सत्याग्रह आदोलन सुरु असून याकडे शासन हेतुपुरुस्कर दुर्लक्ष करीत आहे.
उपोषण स्थळी विविध मंत्री, आमदार, खासदार, सामाजिक संघटना जाहिर पाठीबा देत आहे. उपोषण कर्यांची तब्येत खालावले असल्यामुळे शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त कोळी समाज बांधव गिरणा पुला जवळ रस्ता रोखो आंदोलन करीत असून समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.