नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा, हतनूर धरण्याच्या पातळीत वाढ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता आहे. नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नदी, नाले, ओढा, या ठिकाणी जाऊ नये. हतनूर धरण्याच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दि, १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता धरणाचे ४२ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. ३८८२.०० क्युमेक्स विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

हतनूर धरणातील विसर्गामुळे तापी नदीकाठच्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावातील शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणाधिकारी यांनी सुट्टी जाहीर करण्याचा णिरत्नय घेतला आहे. अशा सूचना जिल्हाधिकारी अमान मित्तल यांनी दिल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.