लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय संघ (Indian team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 1 मार्चपासून इंदूर कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसर्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत.
त्यामुळे कांगारू संघावर आता पराभवाचे सावट आहे. इंदूर कसोटी हरताच ऑस्ट्रेलियन संघ मालिका गमावेल. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अॅश्टन एगर, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल स्वीपसन तिसऱ्या सामन्यातून बाहेर आहेत. लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसर्या कसोटीतून वगळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कांगारू संघावर पराभवाचे सावट आहे.