आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा

0

नवी दिल्ली ;- अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची बांधणी करण्यात आली आहे. BCCI ने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती सिद्ध झाल्याने बुमराहने आशिया चषकाच्या संघात स्वतःची जागा निश्चित केली आहे. याशिवाय संघात कोणाचा समावेश असेल याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार),.हार्दिक पंड्या (उप कर्णधार) शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज प्रसीध कृष्ण राखीव खेळाडू: संजू सॅमसन

Leave A Reply

Your email address will not be published.