मोठी बातमी; मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन अज्ञान व्यक्तींनी त्यावर हल्ला केला आहे. यासंबंधीची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलीस ठाण्यात नोंदवाली आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरती त्यांचा पाठलाग केला. ते आमच्या गाडीच्या समोर आले. त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती आमच्याजवळ आले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.