आधी पळून जाऊन केले लग्न, तरुणाने केला प्रियसीवर धारधार शस्त्राने हल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

परभणी जिल्ह्यात एक संताप जनक घटना घडली आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका शाळकरी विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील ही घटना असून, या जीवघेण्या हल्ल्यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. एवढच नव्हे तर, विद्यार्थिनी वर चाकू हल्ला करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर तरुणी ही बोरी येथील संभाजीनगर येथे वास्तव्यास होते. बोरी येथील एका शाळेत नववी शिकत होती. बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील वस्तीतून ती शाळेत येत होती. त्यावेळी विद्यार्थिनीला गाठून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तिला परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, जखमी झाल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला झाल्याने शाळेतील परिसरात भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, तरुणीवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी हा हल्ला करून स्वतःच बोरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने आपले या तरुणी सोबत लग्न झाले असल्याचा दावा करत असल्याची माहिती दिली. त्याने ते दोघं पती-पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितलं. पण त्याने तरुणीवर हल्ला का केला. हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. रोहित गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.