लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करताना दिसत आहे. लोकांनी युपीआय पेमेंट करण्यावर जास्त भर दिला आहे. यासाठी भारतीय अॅप्सचा वापर करावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भारतीय अॅप्सचा वापर करून लोकांना पेमेंट करावे यासाठी मेक इन इंडिया या संकल्पनेवर जास्त भर दिला जाणार आहे.
आरबीआयने काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट अॅपवर कारवाई केली आहे. त्यामुळे देशातील युपीआय पेमेंटचा वापर बंद करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. परुंतु देशातील युपीआय पेमेंट बंद होणार नसल्याचे आत सांगण्यात आले आहे. यूपीआय पेमेंटसाठी अनेक अॅपचा वापर केला जातो.
पेटीएम पेमेंट्सच्या कारवाईनंतर गुगल पे आणि फोन पे वरील युजर्स वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे १५ ते २० टक्के फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात युपीआय पेमेंट्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. युपीआय पेमेंटसाठी सरकार भारतीय अॅप्सवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे Make In India वर भर पडेल.
देशात फोन पे या अॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. BHIM अॅपचा वापर सर्वात कमी होत आहे. त्यामुळेच भीम अॅप जास्त लोकांनी वापरावे यासाठी प्रयत्न केलं जात आहे. लोकांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. जेणेकरुन लोकांना भीप पे अॅपचा वापर वाढवला पाहिजे.