Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»शेतकर्‍याचा प्रांत कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न
    कृषी

    शेतकर्‍याचा प्रांत कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 25, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमळनेर तालुक्यातील नीम येथे प्रांत कार्यालयासमोरच शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे केळीचा बाग धुळीने उद्धवस्थ झाल्याची तक्रार करून देखील कारवाई न झाल्याने निम येथील शेतकऱ्याने प्रांत कार्यालयाबाहेर दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी दोर ताब्यात घेऊन शेतकऱ्याचे मतपरिवर्तन करून प्रांताधिकाऱ्यांसमोर हजर केल्याने यंत्रणेला कारवाईचे आदेश देण्यात आले.

    याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील निम येथील शेतकरी सुनील शिवाजी पवार याच्या गट न ५४ / ब मध्ये सहा बिघे क्षेत्रात केळी लावली आहे. मात्र त्यांच्या शेतातून वीट भट्टीसाठी माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जात असल्याने केळीवर धूळ बसून केळी खराब होत आहे. याबाबत शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र तहसीलदारांनी तलाठीला पाठवतो म्हणून आश्वासन दिले. तलाठी गेले पण माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर बंद झाले नाहीत.

    शेतकऱ्याने पुन्हा प्रांताधिकारीकडे तक्रार केली. आणि ५०० ब्रास पेक्षा जास्त २-२ हजार ब्रास माती साठा झाला असून त्याही पेक्षा जास्त विटांचा माल पडला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली होती असेही शेतकऱ्याने सांगितले. प्रांताधिकारी यांनी देखील तलाठीला चौकशीला पाठवले. परंतु माती वाहणारे ट्रॅक्टर बंद झाले नाही. व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल घेण्यास नकार दिल्याने शेतकरी व्यथित झाला. त्याने दोर सोबत आणून प्रांत कार्यालयाबाहेर दोर बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

    त्याचवेळी मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे, अव्वल कारकून भूषण पाटील, शिपाई एकनाथ मैराळे, महेंद्र शिरसाठ यांनी त्याचा दोर ताब्यात घेऊन त्याचे मन परिवर्तन करून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्यासमोर हजर केले. प्रांत यांनी तहसीलदार मिलिंद वाघ याना बोलावून घटनास्थळी पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तर संबंधित तलाठीला नोटीस देण्यात आली आहे.

     

    Amalner news Farmer's suicide attempt
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026

    हिमाचल प्रदेशसह जम्मू काश्मीर मध्ये महाभयंकर तांडव!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif