मुळशी जि.पुणे – आ. मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव ते किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेल्या बसेस चा ताफा आज सकाळी पुण्याच्या पुढे ताम्हिणी घाटात आल्या मात्र त्याठिकाणी काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे झाड उन्मळून पडल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. महाराष्ट्र भरातून रायगड कडे जाणाऱ्या हजारो शिवप्रेमींची व प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत होती.
त्यावेळी चाळीसगाव येथील शिवप्रेमींनी पुढे न जाता तिथेच थांबून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केलं व रस्ता मोकळा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय… आमदार मंगेशदादा चव्हाण आगे बढो च्या घोषणा देत शिवप्रेमींनी हे आव्हान लीलया पार केलं. चाळीसगावच्या शिवप्रेमींच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. युवाशक्तीला चांगली दिशा मिळावी या उद्देशाने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सुरू केलेल्या रायगड वारीचा हा सकारात्मक परिणाम म्हणावा लागेल.