Breaking : महाराष्ट्रात आज पासून संचारबंदी ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

0

मुंबई: करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. आज पासून राज्यात संचारबंदी जारी झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदी दरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.आज पासून प्रार्थनास्थळे बंद राहतील असंही ठाकरे यांनी सांगितले आहे.

खाजगी वाहनेही आवश्यक असेल तरच बाहेर पडतील. खाजगी वाहनात चालक आणि दोन व्यक्ती अशी परवानगी. रिक्षात चालक आणि एक व्यक्ती.

Leave A Reply

Your email address will not be published.