जळगाव ;- शहरातील एका भागातून १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी केल्यावरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी १९ वर्षीय मुलगी हि ८ जून रोजी सायंकाळी साडेचार ते साडे पाच वाजेच्या सुमारास काही एक न सांगता घरातून निघून गेली . तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने रामांनंद नगर पोलिसांत पालकांनी फिर्याद दिल्याने हरविल्याची नोंद करण्यात आली आहे .