जळगाव :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील पाथरी येथील भागवत दगडु पाटील (वय ६५) यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाथरी येथे भागवत पाटील हे वास्तव्या असून त्यांची गावालगतच भावासोबत सामाईक शेती आहे. शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शेतीसाठी
त्यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास ते आपल्यात शेतात गेले. काही वेळ त्याठिकाणी थांबल्यानंतर ते त्यालाच लागून असलेल्या भावाच्या शेतातमध्ये गेले. याठिकाणी कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत भागवत पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
पंचनामा करीत मृतदेह रुग्णालयात दाखल घटनेची माहिती पोलीस पाटील
संजीव लंगरे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हेमंत पाटील व प्रदिप पाटील यांनी लागलीच त्याठिकाणी धाव
घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post