आदिल खानने राखीवर दाखल केला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मानहानीचा खटला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचा पती आदिल खान (Adil Khan) यांच्यात झालेला वाद हा जगजाहीर आहे. नुकतीच आदिल खानची तुरुंगातून सुटका झाली आहे. बाहेर येताच आदिलने राखी सावंतवर अनेक गंभीर आरोप केले. राखीने नुसताच त्याचा छळ केला नाही तर, त्याची फसवणूक केली आणि खोटे आरोप लावले. असा दावा त्याने केला.सातत्याने या दोघांमध्ये वाद सुरु असून, जणूकाही यांच्यात जुगलबंदी सुरु असल्याचे जाणवत आहे. आणि आता आदिल रक्त नाही तर, आदिलला राखीची जिवलग मैत्रिण राजश्रीचीही सोबत मिळाली आहे. राजश्रीनेसुद्धा राखीवर बरेच आरोप केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राखीच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे दोघेही मीडियामध्ये एकमेकांवर अनेक आरोप करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे दोघेही एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे.

हज यात्रा पूर्ण केल्यानंतर तिने पुन्हा आदिलवर निशाणा साधला आहे. मात्र तिच्या अडचणी काही केल्या कमी व्हायच्या नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आता आदिल खानने तिच्याविरुद्ध 200 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. आदिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याने राखीवर आरोप करत तिच्यावर मानहानीचा दावा दाखल केल्याचं सांगितलं. मात्र त्याने 1-2 लाख रुपयांसाठी नव्हे तर तब्बल 200 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.