मुंबई :– मी इथेच बसलोय, सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे. सामानाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून याचा प्रोमोही ट्विटरला शेअर केला आहे.
महाराष्ट्रात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे? अशी विचारणादेखील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केली आहे. तसेच आता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?, अशीदेखील विचारणा केली आहे. आपल्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे म्हणाले कि, मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असे नाही आहे. हा योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशा दोन भागांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.