जळगाव : कोरोना व्हायरस हा अत्यंत घातक रोग असून त्यानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन केले आहे. दरम्यान या जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाला रोखण्यासाठी किंवा त्याला ब्रेक लावण्यासाठी होणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. तसेच याबाबतचे जे प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितले गेले आहे त्याचे पालन करायचे आहे असेही ते म्हणले.
पंतप्रधांनी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद द्या, कोरोना सारखे भयंकर संकट आपल्यावर आले असून त्याला दूर करण्यासाठी सहकार्य करा असेही खडसे म्हणले.