४० वर्षीय इसमानाची गळफास घेऊन आत्महत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजता उघडकीस आली. भरत रमेश आंबेकर (वय ४०) असे मयताचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरत रमेश आंबेकर हे शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. ते हात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. त्यांच्या पत्नी सविताबाई ह्या बाहेर कामानिमित्त गेल्या होत्या तसेच मुलगा कल्पेश आणि किरण हे शाळेत गेले होते. त्यामुळे भरत आंबेकर हे एकटेच घरी होते. यावेळी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. भरत आंबेकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. गेल्या ४ दिवसात परिसरातील हि दुसरी आत्महत्येचे घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.