आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या १८ मजुरांना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम सुरू आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील अटाळी व पातुर तालुक्यातील तुलंगा येथील २६ मजूर काम करण्यासाठी कारला या गावांमध्ये आले होते. आज सकाळी अचानक यातील काही लोकांना मळमळ,उलट्या,पोट दुखणे,संडास असा त्रास होत होता त्यामुळे त्यांनी सकाळीच जवळच असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे धाव घेऊन उपचार घेतले. उपचार दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव येथे उपचार सुरू आहे.