हतनूर धरणात पाण्याचा ठणठणाट ; बिकट परिस्थिती

0

पाण्याअभावी भुसावळसह अन्य गावांवर जलसंकट
भुसावळ :- अवघा जून संपत आला तरीही पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. तालुक्यातील हतनूर धरणातील जलसाठा संपुष्टात आला आहे मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने पाण्याची पातळी हळूहळू कमी झाली यामुळे शहरासह इतर तालुक्यांना पाण्यासाठी हा धोक्याचा संकेत मानला जातोय. मृतसाठ्यातून फक्त एक आवर्तन सुटेल एवढेच पाणी सद्यस्थितीत शिल्लक आहे. धरणातील संपूर्ण जलसाठा संपला असून धरण कोरडेठक पडल्यामुळे भुसावळ सह इतर सहा तालुक्यांवरही जलसंकट येऊन ठेपले आहे.

जळगाव जिल्हातील हतनूर धरण हे एकेकाळी जिल्ह्यावासीयांसाठी संजीवनी म्हणून ठरलेले हतनूर धरण मात्र यंदा जून महिना संपत आला तरीही पाऊस नसल्याने कोरडेठाक पडल्याने चिंतेची बाब ठरत आहे . हे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. या धरणात जून महिन्यात इतकी विदारक व गंभीर स्थिती यापूर्वी कधीच दिसली नाही.सुमारे 17 ते 18 वर्षांनंतर धरणाची ही स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. परंतू पाहिजे तेवढा पाऊस इतरत्र न झाल्याने धरणाची पाण्याची लेव्हल वाढलेली नाही अद्याप हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली नाही. सन १९९२ मध्ये धरणातील मृत जलसाठ्यात केवळ ५० दलघमी जलसाठा शिल्लक होता. आता तर १९९२ पेक्षाही बिकट स्थिती निर्माण झाली आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात आतापर्यंत अवघा सरासरी १३० मिलीमिटर पाऊस झाला. मात्र उन्हाळा कडक असल्याने जमिनीत पाणी मुरले. मध्यप्रदेशात व सातपुड्याच्या पर्वतात झालेल्या पावसाचा फायदा या धरणाला होतो. मात्र त्या भागातही अद्याप पाऊस झालेला नाही. हतनूरच्या मृतसाठ्यातून सोडलेले आवर्तन भुसावळ तसेच रेल्वेला १५ ते २० जूलैपर्यंत पुरेल एवढेच आहे. दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील बंधाऱ्यातही जूलै अखेरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक न झाल्यास हतनूरवर अवलंबून असलेल्या शहरां सह आणि रेल्वे, औष्णिक विद्युत केंद्र , यासह विविध ठिकाणी तिव्र पाणी टंचाईचे सावट शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.