सोशल डिस्टन्स पाळा : विनाकारण घराबाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करा !

0

भुसावळ  (प्रतिनिधी)-  राज्यात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनावर मात करण्यासाठी नागरीकांनी सोशल डिस्टन्स ठेवावे शिवाय विनाकारण बाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी भुसावळसह रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांना  केले आहे.

प्रशासनाला सहकार्य करा-  

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  प्रशासन, डॉक्टर , परिचालिका, पोलिस यांचेसह सर्व यंत्रणा अहोरात्र अथक परीश्रम करीत आहेत. नागरीकांच्या योग्य सहकार्यामुळेच कोरोनावर मात करणे शक्य आहे याकरीता  नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अनिल  चौधरी यांनी केले आहे. आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी तसेच घरीच नागरकांनी सुरक्षित रहावे, असेही अनिल चौधरी यांनी कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.