सत्तारांच्या राजीनामा म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात : फडणवीसांचा टोला

0

वाशिम : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, सत्तारांच्या राजीनाम्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तारांचा राजीनामा ही या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.  वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या कामासाठी झालं नसून,मलई खाण्यासाठी झालं आहे. आधी विस्तार होत नव्हता, मग नंतर खातेवाटप झाले नाही, आज तर एका मंत्र्यानेच राजीनामा दिला, म्हणजे  या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्यासआधीच सुरु झाली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. यापुढेही असेच नाराज आमदार राजीनामे देऊन हे सरकार कोसळेल असा दावा यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.