शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन शेतकरी करणार संसदेच्या बाहेर आंदोलन

0

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी आधिवेशनाचा आजचा बुधवारी तिसरा दिवस आहे. दरम्यान, शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन केंद्रीतील मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी आज शेतकरी संसदेच्या बाहेर आंदोलन करणार आहे. भारतीय किसान यूनियनशी संबंधित शेतकरी संसदेबाहेर आंदोलन करणार असून या आंदोलनामध्ये हरयाणा, तेलंगना, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भातील माहिती भारतीय किसान यूनियनचे नेते गुरनाम सिंह यांनी दिल्याचे ‘न्यूज १८ हिंदी’ने म्हटलं आहे.

हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी शेती संदर्भातील तीन अध्यादेशांचा विरोध करण्यासाठी आज संसदेबाहेर धरणं आंदोलन करणार आहेत. याचबरोबरच पंजाबमधील भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्यि शिरोमणि अकाली दलही या अध्यादेशांवर नाराज असल्याचे दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोमणि अकाली दल या अध्यादेशांच्या विरोधात मतदान करणार आहे.

बंदरावरील कंटेनरचं काय करायचं?

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रामध्येही आज अनेक ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सध्या बंदरांवर असलेल्या ७१२ कंटेनर कांद्याचे काय होणार यासंदर्भात संभ्रम कायम आहे. या कंटेनर्समध्ये एक किलोपासून ५० किलोपर्यंत वेगवगेळ्या प्रकारचे कांद्याचे पॅकिंग आहेत. आता निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरुन तयार असणाऱ्या कांद्याचे काय होणार असा प्रश्न निर्यातदारांना पडला आहे. एका कंटेनरची किंमत ८ ते १० लाखांदरम्यान आहे. कांदा नाशवंत असल्याने कंटेनर वेळेत गेले नाही तर होणाऱ्या नुकसानाचा भूर्दंड निर्यातदारांच्या माथी येईल. काँग्रेसनेही आज या निर्यात बंदीविरोधात आंदोलन करणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.