शिरूड परिसरात पावसाची हजेरी ; बळीराजाला मिळाला दिलासा..

0

शिरूड, ता.अमळनेर:-  बऱ्याच दिवसापासून पावसाने दांडी मारली असता  परिसरात शेतकऱ्यांनी कापूस, उडीद मुंग सोयाबीन, तूर, हे प्रमुख पिके  कोलमडायला लागली होती  ज्वारी बाजीरी देखील पेहरणी झाली असता निमिनीतू वर येणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती  जून महिना संपत आला असून देखील समाधान कारक पासून नसून शेतकरी वर्ग नाराज होता मात्र आजच्या अगमनाने  पिकासह बळीराजा चा चेहरा फुलला

जून महिन्याच्या सुरवातीला झालेलं रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणी या कामांना गती देत लवकर आटोक्यात आणली  कोरोना आजारामुळे गावातील ग्रामस्थ बाहेर जाऊन परत आल्यामुळे शेतीकामासाठी मजुरांची सध्या तरी कमतरता जाणवत नाही.तसेच सद्या ची स्थिती पाहता पावसाची वाट पाहत तहानलेल्या पिके आता  कोलमडाय ला लागल होती ती पीक मात्र आजच्या पावसाने बहरली  पाऊस येणार या चिंतेत बळीराजा होता सकाळपासून रोज चे  आभाळ भरून येते मात्र तीच संध्याकाळ होऊन जात असे या  उद्या येईल या आशयाने दिवस काढत असतो वेळोवेळी डोक्यात एकच चिंता

आपले एवढे महाग मोलाचे मातीत  पेहरलेले बी-बियाणे ाया  च काय होईल ते मातीमोल होणार तर नाही या भीतीने तो भयभीत झाला होता  दिवसा भरून येणारे हे आभाळ यातून कधी सारी येणार या आशेन बळीराजा चे डोळे आभाळाकडे एकटक बघत  मात्र आज  शिरूड परिसरात बळीराजावर चागली मेहरबानी करत पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली  शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कोंमडलेल्या पिकांची  मान आता उंचावली असून पिकांना धिवसा मिळाला

Leave A Reply

Your email address will not be published.