जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील पाळधी येथे कपासाची गाडी भरत असतांना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय तरूण जागीच मृत झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
तालुक्यातील पाळधी येथे आज १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापसाची गाडी भरत असतांना टपावर बसलेले तिघे जण ट्रकवरून खाली उतरत असतांना विजेच्या तारांचा विजेचा जबर धक्का लागल्याने विशाल बाबुराव श्रीखंडे (वय २५, रा. माळपिंप्री) या मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले ज्ञानेश्वर श्रावण काळे व ज्ञानेश्वर सिताराम भजे रा. माळपिंपरी हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.