जळगाव– शहरात संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी विविध मंडळात नवरात्री निमित्त देवीची स्थापना झाली. सोमवारपासून रासगरबा दांडियाला सुरुवात होणार होती मात्र, संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने यावर पाणी फिरल्याने तरुणार्इत नाराजी व्यक्त करण्यात आली.
संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सर्वच भागात पाणी साचले होते. अनेक देवीमंडळांच्या छत्र्या पाण्याखाली आल्या. नुकताच पितृपक्ष संपला आहे. पितृपक्षात ऊन तीव्र असते. सोमवारी कडक ऊन व उकाडा वाढला होता. पितृ पक्षातील ऊन असल्याचे वाटले होते. मात्र संध्याकाळी वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने मात्र कामावरुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र त्रेधा उडाली.