अहमदाबाद : गुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बनासकांठामधील त्रिशुलिया घाट, अंबाजी जवळ भाविकांची बस उलटल्याने हा अपघात झाला असून या बसमधील २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बस घाटातून जात असताना वळणावर नियंत्र सुटल्याने पलटली.
पोलिसांनी सांगितले की, अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. संशय व्यक्त केला जातोय की, ड्रायव्हरला गाडी चालवताना झोप लागली असावी. या अपघातामुळे हायवेवर मृतदेह आणि रक्ताचा सडा पडला आहे. दरम्यान बसमध्ये अडकलेल्या लोकांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे.