वरणगांव (प्रतिनिधी) : येथिल बस स्थानक चौकात आज ४८ तासांचा अवैध जनता कर्फ्यू पार पडल्यानंतर सकाळपासून नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टं सिंग राखण्याच्या नियमाला हरताळ फासला गेला होता.
याबाबत वृत्त असे की सध्या देशामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले असून भारतात मात्र केंद्र व राज्य सरकारे मिळून निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना केला जात आहे .व त्यासाठी वेळोवेळी कठोर पावले ऊचलले जात आहेत . शासनामार्फत सर्व राज्यात परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे . ठराविक वेळेत नागरिकाना सोशल डिस्टं सिंगचे पालन करून घराबाहेर पडण्याची सुट देण्यात आली आहे .परंतु काही निष्काळजी नागरिकांना याचे काही सोयरं सुतक नाही . असे चित्र आज वरणगांवात पहायला मिळाले .बाजारात व भाजी विक्रेत्यांच्या दुकानावर नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नियमांची पायमल्ली न करता सोशल डिस्ट सिंग चे पालन करावे . अशी चर्चा सुज्ञ नागरिक करीत होते.